इतिहास

नवीन माहिती

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार
वीस लाखांहून अधिक वाचक,
मराठी देशा लवकरच नवीन रूपात
शिवछत्रपतींचे सुबक
छत्रपती शिवरायांची वंशावळ
बाजी पासलकर
नेताजी पालकर
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
तानाजी मालसुरे
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी प्रभू
जीवबा महाला
संभाजी कावजी
येसाजी कंक
सुर्यराव काकडे
कान्होजी जेधे
फिरंगोजी नरसाळा
कोंडाजी फर्जंद
दर्यावीर मायनाक भंडारी
दर्यावीर लायजी पाटील
हिरोजी फर्जंद
आबाजी महादेव
रामजी पांगेरा
गोदाजी जगताप
शिवा काशीद
मुस्लिम सेनानी
सिधोजी निंबाळकर
नावजी बलकवडे

 

Visit http://www.ipligence.com
Visitors Location
इ.स.६जून,१६७४,ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी राज्याभिषेक शक ३३८प्रारंभ

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववन्दिता ।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्‍ववंदनीय होतो,तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्‍वाच्या लोककल्याणासाठी शोभत आहे,राज्य करत आहे.

नमस्कार मंडळी... छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रधर्माची शिकवण,महाराष्ट्राचा खरा इतिहास व संस्कृती आपल्या पर्यंत पोहचविण्याचा हा एक छोटासा प्रपंच ... छत्रपति शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या आणि साधू-संताच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या,महाराष्ट्र भूमीचे वर्णन काय करावे?.अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात,शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो.सर्वप्रथम महाराष्ट्राचा,"राष्ट्र"या नावाने उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो.प्राकृत भाषेत तर,"महाराष्ट्री"असेही म्हटले जाते.चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या कालखंडात महाराष्ट्राला , "राष्ट्रिक" या नावाने संबोधले जाई,असे 'ह्युएन-त्सांग' या चिनी प्रवाशाने केलेल्या नोंदीत आहे.

पाचव्या शतकातील बौध्द ग्रंथात(दीपवंस,महावंस)तसेच विजापूर परिसरातील कोरीव लेख (सातव्या शतकातील जितेंद्र मंदिर),कविराज उद्योतनसुरी यांच्या "कुवलयमाला"(आठवे शतक),चक्रधर स्वामींच्या "ऋद्धीपूर महात्म्य" या ग्रंथात,आदि सर्वामध्ये महाराष्ट्र,मरहट्ट,महारठ्ठ असे उल्लेख आहेत.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कालखंडाचा उदय सम्राट अशोकाच्या मौर्य काळापासून सुरू होतो.मौर्य सम्राट अशोकाच्या कालखंडात(इ.स.पू.२६९-२३६)महाराष्ट्रात व्यापाराची भरभराट झाली.मौर्य काळामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बौध्द धर्माचा प्रसार झाला.सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर भारतातील पहिल्या बलाढ्य अशा मौर्य साम्राज्याचा र्‍हास झाला.मौर्य साम्राज्याचा र्‍हासानंतर भारतात अनेक लहानमोठी राज्ये उदयास आली.

दक्षिण भारतात उदयास आलेले सातवाहन साम्राज्य अत्यंत शक्तिशाली होते.सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात(अंदाजे इ.स.पू.२२०-इ.स.२१८)महाराष्ठ्राची साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.पैठण(जिल्हा औरंगाबाद)ही सातवाहनाची राजधानी होती.सतरावा सातवाहन राजा हाल याचे "गाथासप्तशती" हे प्राकृत भाषेतील महाकाव्य साहित्याला मोठी देणगी आहे.

1 2 3 4 पुढील पान

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’

Latest visitors